राजकारणराज्य

महाराष्ट्रात लवकरचं राजकीय भूकंप; जी चर्चा सुरुय ते नक्की होणारचं आहे, त्याच्याबद्दल कोणी शंका आणू नये –

0

माझा कट्टा | प्रतिनिधी

– महाराष्ट्रात लवकरचं राजकीय भूकंप होणार आहे. सध्या महाराष्ट्रात जी चर्चा सुरुय ते नक्की होणारचं आहे, त्याच्याबद्दल कोणी शंका आणू नये. त्याचबरोबर महाराष्ट्रात पुढच्या निवडणुका जिंकण्यासाठी भाजपला काहीना काही चमत्कार करावा लागणार आहे. असं मोठं अन खळबळजनक वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळुंके यांनी केलं आहे. ते बीडच्या माजलगावमध्ये जाहीर पत्रकार परिषदेत बोलत होते. तर त्यांच्या वक्तव्यांने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत आमदार प्रकाश सोळुंके म्हणाले, की सध्या महाराष्ट्रात चर्चा आहे, असं होणार तसं होणार, ते बोलणारा थांग पत्ता लागून देत नाही, ते काय होणार ? पण होणारचं आहे, जे व्हायचंय ते होणारचं आहे.. महाराष्ट्रात जी चर्चा आहे ते होणारचं आहे, त्यांच्याबद्दल कुणी मनामध्ये शंका अनु नये..

राजकारणाचं घडामोडीचे काय व्हायचंय ते होवो.. मी गेल्या 15 दिवसांपासून मुंबईला गेलो नाही, माझी कुणाशी चर्चा झाली नाही. परंतु 35 वर्षाच्या राजकारणानंतर , राजकारणाचं काय होणं अपेक्षित आहे ? याची जाण मला आहे.म्हणून मी स्टेटमेंट दिलं. मात्र निश्चितचं काहीना काही भूकंप नक्कीच होण्याची परस्थिती आहे

दुर्दैवाने महाराष्ट्रात आज परस्थिती अशी निर्माण झालीय, स्थिर राज्य आणि पुढच्या निवडणुका जिंकण्यासाठी भाजपला असा काहीना काही चमत्कार महाराष्ट्रात करावा लागणार आहे.

असं जाहीर वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळुंके यांनी बीडच्या माजलगाव मध्ये आयोजित पत्रकार परिषदेमधून केलं आहे. दरम्यान या अगोदरही प्रकाश सोळुंके हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होती. मात्र आता पुन्हा एकदा राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य करत त्यांनी एक प्रकारे राज्यात पुढच्या काही दिवसात, मोठ्या राजकीय घडामोडी होण्याचे संकेत दिले आहेत.

भाजपची बाजार समिती निवडणुकीत विजयी सुरुवात…

Previous article

सूतगिरणी, दूध संघ आणि बँकेनंतर आता बाजार समितीतही यश मिळणारच – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

Next article

You may also like

Comments

Comments are closed.