माझा कट्टा | डेस्क
ओबीसींची जनगणना झाली पाहिजे. त्यासाठी सर्व ओबीसींनी एकत्रित येऊन वज्रमुठ बांधली पाहिजे. असे आवाहन नवनियुक्त राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांनी केलंय. यासाठी आगामी काळात ओबीसी ऐक्य यात्रा राज्यभरातून काढणार असल्याची घोषणा देखील कल्याण आखाडे यांनी केलीय.
राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे काय म्हणाले पहा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बीड जिल्ह्यातील सर्वच आजी माजी आमदारांकडून सत्कार समारंभ अयोजित करण्यात आला होता. यावेळी आखाडे बोलत होते. दरम्यान या निवडी नंतर धनंजय मुंडे यांनी स्वतः कल्याण आखाडे यांना फेटा बांधून त्यांचे अभिनंदन केले आहे.
Comments