माझा कट्टा | डेस्क
– दुसऱ्याला खोके एकदम ओके म्हणायचं आणि इकडे खोक्याच्या राशी स्वतः गोळा करायच्या ? त्यामुळं महाप्रबोधन यात्रा ही फक्त कलेक्शन साठी आहे का ? असा प्रश्न शिवसेनेचे माजी मंत्री सुरेश नवले यांनी उपस्थित केलाय.. बीडमध्ये महाप्रबोधन यात्रेच्या अगोदर महाकलेक्शनच्या वादातून घडलेलं हे पर्यावसान म्हणजे हा मारहाणीचा प्रकार आहे. तुमचा वाटा किती आणि आमचा किती ? वाट्यावरून हे वाटेकरी आपआपसामध्ये भांडले. त्यामुळे महाप्रबोधन यात्रा ही फक्त कलेक्शनसाठी आहे का ? असा प्रश्न नवले यांनी उपस्थित केला आहे. महिला व हात उभारणार्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखावर पोलिसांनी सोमोटो गुन्हा दाखल करावा. अशी मागणी देखील सुरेश नवले यांनी केलीय..बीडमध्ये पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
काय म्हणाले सुरेश नवले पहा एका क्लिकवर
पुढे बोलताना सुरेश नवले म्हणाले, की बीड जिल्ह्यातील जनता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सर्व प्रमुखांना विचारते. या प्रश्नाचे उत्तर त्यांनी उद्या महाप्रबोधन यात्रेमध्ये द्यावे. मुळामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये ज्या नेमणुका होतात, त्याचं पैसे घेऊन केल्या जातात. फक्त निधी कलेक्शन व दुसऱ्याला खोके एकदम ओके म्हणायचं आणि इकडे खोक्याच्या राशी स्वतः गोळा करायच्या, अशी विसंगती हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून चालू आहे. याचा निषेध आणि धिक्कार व्यक्त करतो, असेही सुरेश नवले म्हणाले..
Comments