माझा कट्टा | नारायणगड, बीड
छत्रपती संभाजीनगर येथे 2 एप्रिल रोजी होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभेवरून, मंत्री संदिपान भुमरे यांनी टीकास्त्र सोडले आहेत. ते एकटे सभा घेत नाहीत, तिघे मिळून सभा घेतात.अशी टीका करत त्यांनी अशा कितीही सभा घेतल्या, तरी युतीचेच सरकार येणार. असा विश्वास यावेळी संदीपान भूमरेंनी व्यक्त केला. ते बीडच्या नारायणगड येथे दर्शनासाठी आले असता मीडियाशी बोलत होते.
ते म्हणाले, की महाविकास आघाडीची सभा छत्रपती संभाजी नगर येथे होत आहे. मात्र त्याने आम्हाला काही फरक पडत नाही..त्यांनी कितीही सभा घेतल्या तरी युतीचंचं सरकार येणार आहे. आज सगळ्या ठिकाणी त्यांना महाविकास आघाडी म्हणून सभा घ्यावी लागत आहे. ते एकटे सभा घेत नाहीत, तिघे मिळून सभा घेत आहे. मात्र संभाजीनगरची जी सभा होईल , ती फक्त शिवसेनेची होईल. मग ती कशी होईल ते बघा..असं म्हणत उघड आव्हान देखील यावेळी भुमरे यांनी दिलंय.
दरम्यान प्रकाश आंबेडकर येउद्या, राष्ट्रवादी येऊद्या, ठाकरे गट येऊद्या , पानिपत कुणाचं होतं ते 2024 च्या निवडणुकीत दिसेल. असं म्हणत त्यांनी प्रकाश आंबेडकरांवर देखील निशाणा साधला. काय म्हणालेत संदीपान भुमरे पाहुयात..
Comments